अरुणकुमार ढोले यांच्या बद्दल
नाव: | डॉ. अरुणकुमार शामराव ढोले |
पिताश्री: | श्री शामराव दत्तात्रयपंत ढोले |
मातोश्री: | अनुसयाबाई शामराव ढोले |
जन्म: | ९ नोव्हेंबर १९२१ ग्राम नया अकोला |
शालेय शिक्षण: | न्यू हायस्कूल (मेन) अमरावती |
वैद्यकीय शिक्षण: | डी. एम. एस. (होमिओपॅथीक) कलकत्ता १९४३ |
विवाह: | १९४२ सौ. वेणुताई |
बालपणी मार्गदर्शन: | काका बॅरिष्टर श्री पुरुषोत्तम दत्तात्रयपंत ढोले |
शिक्षकेत्तर मागदर्शन: | पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन त्यांचेच होमिओपॅथिक दवाखान्यात प्रशिक्षण. |
राजकीय: | आर्यसमाज तर्फे श्री नानासाहेब भट यांचे नेतृत्वाखाली पैनगंगा तीरावर १९३९ साली हैद्राबाद मुक्ती आंदोलनात सक्रीय भाग घेतल्याबद्दल फिरंगी सरकारतर्फे अटक. चंचल गौडा जेल (नांदेड हैद्राबाद) चार महिने कारावास. |
गौरव सरकार: | १९८६ महाराष्ट्र शासन तर्फे स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून सन्मानित |
संस्थापक | १) ६ ऑक्टोबर १९५४ पासून मातृसदन चॅरिटेबल हॉस्पिटल अमरावती कॅम्प मा. डॉ. शिवाजीराव पटवर्धन, ना. मा. सा. कन्नमवार तत्कालीन आरोग्य मंत्री उपस्थिती. |
२) १९५८ डॉ. सॅम्युअल हॅनिमन चॅरिटेबल मेडिकल एड अॅण्ड सोशल हेंल्थ सोसायटी अमरावती. | |
३) १९५९ होमिओपॅथिक व बायोकेमिक मेडिकल कॉलेज प्रथम डी. एच.बी दोन वर्षाचा अभ्यासक्रम व नंतर महाराष्ट्र राज्यात डी. एच. एम. एस. चार वर्षाच्या अभ्यासक्रमास शासनाची परवानगी मिळविली त्यासाठी भगिरथ प्रयत्न. |
भूषवलेली पदे
१) १९८० महाराष्ट्र राज्य होमिओ व बायोकेमिक बोर्ड मुंबई अध्यक्ष म्हणून निवड, १९५६ ते ८१ पर्यंत मध्यप्रदेश व महाराष्ट्र होमिओ बोर्डाचे सदस्य.
२) केंद्रीय होमिओ संचालनालय नई दिल्ली व महाराष्ट्र राज्य पातळीवर होमिओपॅथिक शिक्षण प्रणाली व अनुसंघान अन्वये कार्यवाही करून महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषद व नगरपरिषदेला भेटी देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली होमिओपॅथिक दवाखाने सुरु करण्यात आले.
३) अतिशय परिश्रमाने अमरावती विद्यापीठात होमिओपॅथिक पदवी अभ्यास सुरु. १९८६ साली होमिओपॅथिक अॅण्ड बायोकेमिक मेडिकल कॉलेजचे नामांतर पं. जवाहरलाल नेहरू मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक मेडिकल सायन्सेस मध्ये रूपांतर.
४) होमिओपॅथिक क्षेत्रात उज्ज्वल कार्य केल्याबद्दल ताम्रपट प्रदान करून कर्नाटक शासनाने भव्य सत्कार केला. वेगळा योग्य पायंडा १९७१ होमिओपॅथिकचे शैक्षणिक दृष्ट्या महत्व वाढून नेत्रदीपक प्रगती व्हावी ह्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शैक्षणिक अनुसंघान व होमिओ वास्तुची चिरंतर स्मृती राहील ह्या दूर दृष्टीने महाविद्यालयाचे जेष्ठ कर्मचारी श्री कारीमभाई व श्री शिवदीन बाबा ह्यांचे अध्यक्षतेखाली व त्यांचेच खऱ्या अर्थाने शुभहस्ते पायाभरणी कार्यक्रम व उद्घाटन सोहळा पार पाडून खऱ्या श्रमिकाला योग्य सन्मान देऊन जनतेस आगळा वेगळा उपक्रम दाखवून दिला. १९४६-४७ साली सिंधी बांधवाच्या छावणीवसविण्यास Rehabitation हातभार लावून वैद्यकीय व इतर सेवा दिल्यात. व्दारकानाथ अरोरांना सहकार्य केले. १९६३-६४ मध्ये श्री ब्रिजलाल बियाणी यांचे खांदयाशी खांदा लावून विदर्भ आंदोलनात सक्रीय भाग दैारा लोक जागृतीचे कार्य.
५) जनसंघाच्या तालीम मध्ये बालपणापासून सहभाग त्यामुळे स्वभाव करारी, सत्याग्रही, कृतिशील, ध्येयवादी, चळवळ्या, कणखर व अत्यंत शिस्तप्रिय झाला. सांघिक कवायत, बलम् उपास्व मुळे शरीर सौष्ठव संपन्न, सुसंस्कार जनसंघाची देण ठरली. १९४८ महात्मा गांधीच्या खुनामुळे जनसंघी कार्यकर्त्यांना अटक. त्यावेळी अमरावती, नांदेड, जबलपूर कारागृहामध्ये कारावास. १९६८ कर्मवीर डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख कृषक भाग्य विधाता तेव्हा विदर्भात कृषी विद्यापीठ स्थापनार्थ झालेल्या आंदोलनात सक्रीय सहभाग त्यामुळे अमरावती कारागृहात कारावास. सत्यासाठी उपोषण, आंदोलनात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली त्यांचे स्मारकासाठी प्रयत्न. १९६७ मध्ये जनसंघ सोडून विधान सभेकरिता अपक्ष उमेदवारी, उगवता सूर्य चिन्ह तमसोमा ज्योतिर्गमय. अंधकारातून प्रकाशाकडे सदैव गरुड झेप. नागपूर विद्यापीठ बोर्ड ऑफ स्टडी सदस्यत्व अमरावती विद्यापीठ बोर्ड ओड स्टडी सदस्यत्व, इंटरनॅशनल कॅान्फरंस सदस्यत्व, कॉंग्रेस सदस्यत्व. आर्थिक परिस्थिती सबळ नाही. राजकीय पाठबळ नाही. श्रीमंतीचा पारंपारिक वारसा नाही कि कसलेही शासन अनुदान नाही अशाही सामान्य प्रतिकूल परिस्थितीतून केवळ ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ ह्या निष्काम निर्व्याज मानसेवेसाठी बहुजनोपयोगी उपक्रम सुरु केले. शुन्यातून अक्षरशः होमिओपॅथिचे विश्व निर्माण केले ह्यातच त्यांचे असामान्यत्व प्रगट होते. ‘सेवका सतत जळत तू रहा’ ह्या उक्ती प्रमाणे तहहयात जळणारा हा प्रदीप. ९ नोव्हेंबर १९२१ साली अरुणोदयाचा ११ जानेवारी १९९४ साली अरुणास्त झाला. अन् समाज सृजनशील कर्तुत्वशील धन्वंतरीला सदा सदाचा पारखा झाला. तीर्थरूप बाबांना ‘मरावे परी किर्ती रुपी उरावे’ ह्या महाराष्ट्र संत श्री रामदासांच्या उक्ती प्रमाणे अमरत्व प्राप्त झाले.
डॉ. श्रीरंग ढोले
- प्राचार्य होमिओपॅथिक अॅन्ड बायोकेमिकल
मेडिकल कॉलेज, अमरावती